जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।
श्री ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासत ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण गावाने शेतीचे सर्व 102 एकर क्षेत्र ठिबक खाली आणले. पाणी व खत व्यवस्थापनातून या परिसरातील शेतीचे चित्रच पालटले आहे. विशेष म्हणजे या योजनेत एक ते पाच गुठा क्षेत्र असणारे 16 अल्पभूधारक शेतकरीही आता उत्पन्न घेऊ लागले आहेत. पट्टा पद्धत, एक डोळा बेणे, रोप लागवड, काटेकोर पाणी व खत व्यवस्थापन अशा नव्या तंत्राकडे शेतकरी वळल्याने केवळ ५५ लाख लिटर पाण्यामध्ये उसाची उत्पादकताही अधिक वाढली आहे.
श्री ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासत ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण गावाने शेतीचे सर्व 102 एकर क्षेत्र ठिबक खाली आणले. पाणी व खत व्यवस्थापनातून या परिसरातील शेतीचे चित्रच पालटले आहे. विशेष म्हणजे या योजनेत एक ते पाच गुठा क्षेत्र असणारे 16 अल्पभूधारक शेतकरीही आता उत्पन्न घेऊ लागले आहेत. पट्टा पद्धत, एक डोळा बेणे, रोप लागवड, काटेकोर पाणी व खत व्यवस्थापन अशा नव्या तंत्राकडे शेतकरी वळल्याने केवळ ५५ लाख लिटर पाण्यामध्ये उसाची उत्पादकताही अधिक वाढली आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406
No comments:
Post a Comment