Wednesday, January 23, 2019

मठ

 


मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत.  


परि आवश्‍यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।। 179 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - परंतु अर्जुना, असलें स्थान जरूर शोधून ठेवावें. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावें.

सद्‌गुरू कोणत्याही साधनाने लाभत नाहीत. पण जे निष्कामभावानें, साम्यबुद्धीने सद्‌गुरूंची प्रार्थना करतात. आत्मज्ञान लाभावे अशी इच्छा करतात, त्यांना सद्‌गुरूंच्या इच्छेने या आत्मज्ञानाचा लाभ होतो. सध्या वाढत्या शहरीकरणात साधना, ध्यान-धारणा करण्यासाठी योग्य ठिकाणे सापडणे कठीण झाले आहे. पण ही ठिकाणे शोधली तर सहज सापडतात. पुणे शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणीही अशी ठिकाणे आहेत. जंगली महाराज रोड हा सदैव गजबजलेला. गोंगाट असणारा रस्ता. पण या रस्त्यावरच जंगली महाराजांचा मठ आहे. रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट असला तरी मठामध्ये शांतता आहे. झाडीमध्ये असणारे हे ठिकाण गारवा देणारे, मनाला शितलता, प्रसन्नता देणारे असे आहे. शेजारीच पाताळेश्‍वर मंदीर आहे. या दगडी मंदीरात साधनेसाठी उत्तम वातावरण आहे. धकाधकीच्या या जीवनात अशी ठिकाणे निश्‍चितच मनाला प्रसन्नता देणारी आहेत. मठ किंवा शिवालय हे अध्यात्माची पाठशालाच आहे. येथे आत्मज्ञानाच्या विकासासाठी आवश्‍यक वातावरण असते. मठामध्ये समाधी अवस्थेत सद्‌गुरुंचे नित्य वास्तव्य असते. यासाठी अशा ठिकाणी नित्य साधना करावी. कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती. गावांमध्येही मंदीरामध्ये तंटे, वादविवाद सोडविले जात होते. अशी ठिकाणे ही मने जोडणारी असतात. पण बदलत्या संस्कृतीमध्ये ही ठिकाणे मने जोडण्याऐवजी तोडण्याची ठिकाणे झाली आहेत. धर्माच्या नावावर, मंदीराच्या नावावर मने भडकवली जात आहेत. ज्या ठिकाणे मने जोडण्याचे काम चालायचे तेथे मने दुखवायची कृत्ये केली जात आहेत. अशाने अनेक मंदीरे ओस पडत आहेत. मंदीरांचा उद्देशच नष्ट होत चालला आहे. यामुळे त्या ठिकाणची ओढ कमी होत आहे. मंदीर दिसले तरी दोन मिनिटे थांबून नमस्कार केला जायचा. पण आता थांबायलाही वेळ नाही. मग नमस्कार कधी करणार अशी स्थिती झाली आहे. मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत. मनाला प्रसन्नता देणारी ही ठिकाणे आत्मज्ञानाच्या प्रगतीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतात.


परि आवश्‍यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।। 179 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - परंतु अर्जुना, असलें स्थान जरूर शोधून ठेवावें. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावें.

सद्‌गुरू कोणत्याही साधनाने लाभत नाहीत. पण जे निष्कामभावानें, साम्यबुद्धीने सद्‌गुरूंची प्रार्थना करतात. आत्मज्ञान लाभावे अशी इच्छा करतात, त्यांना सद्‌गुरूंच्या इच्छेने या आत्मज्ञानाचा लाभ होतो. सध्या वाढत्या शहरीकरणात साधना, ध्यान-धारणा करण्यासाठी योग्य ठिकाणे सापडणे कठीण झाले आहे. पण ही ठिकाणे शोधली तर सहज सापडतात. पुणे शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणीही अशी ठिकाणे आहेत. जंगली महाराज रोड हा सदैव गजबजलेला. गोंगाट असणारा रस्ता. पण या रस्त्यावरच जंगली महाराजांचा मठ आहे. रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट असला तरी मठामध्ये शांतता आहे. झाडीमध्ये असणारे हे ठिकाण गारवा देणारे, मनाला शितलता, प्रसन्नता देणारे असे आहे. शेजारीच पाताळेश्‍वर मंदीर आहे. या दगडी मंदीरात साधनेसाठी उत्तम वातावरण आहे. धकाधकीच्या या जीवनात अशी ठिकाणे निश्‍चितच मनाला प्रसन्नता देणारी आहेत. मठ किंवा शिवालय हे अध्यात्माची पाठशालाच आहे. येथे आत्मज्ञानाच्या विकासासाठी आवश्‍यक वातावरण असते. मठामध्ये समाधी अवस्थेत सद्‌गुरुंचे नित्य वास्तव्य असते. यासाठी अशा ठिकाणी नित्य साधना करावी. कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती. गावांमध्येही मंदीरामध्ये तंटे, वादविवाद सोडविले जात होते. अशी ठिकाणे ही मने जोडणारी असतात. पण बदलत्या संस्कृतीमध्ये ही ठिकाणे मने जोडण्याऐवजी तोडण्याची ठिकाणे झाली आहेत. धर्माच्या नावावर, मंदीराच्या नावावर मने भडकवली जात आहेत. ज्या ठिकाणे मने जोडण्याचे काम चालायचे तेथे मने दुखवायची कृत्ये केली जात आहेत. अशाने अनेक मंदीरे ओस पडत आहेत. मंदीरांचा उद्देशच नष्ट होत चालला आहे. यामुळे त्या ठिकाणची ओढ कमी होत आहे. मंदीर दिसले तरी दोन मिनिटे थांबून नमस्कार केला जायचा. पण आता थांबायलाही वेळ नाही. मग नमस्कार कधी करणार अशी स्थिती झाली आहे. मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत. मनाला प्रसन्नता देणारी ही ठिकाणे आत्मज्ञानाच्या प्रगतीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतात.

No comments:

Post a Comment