Tuesday, July 13, 2010

विवेकाचे गाव

ते विवेकाचे गाव । की परब्रम्हींचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रम्हविद्येचे ।।
आदर्श गाव योजनेचे संकल्पना सध्या अनेक गावात राबविण्यात येत आहे. पण पूर्वी जेव्हा ही कल्पना राबविण्यात आली तेव्हा अध्यात्माची जोड त्याला देण्यात आली होती. देव देवळावर जनतेचा विश्‍वास असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर लोकांचा यावरील विश्‍वास अधिकच वाढू लागला आहे. मनाच्या शांतीसाठी लोक याकडे वळताना पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी गावातील अनेक तंटे हे चावडीमध्ये सुटायचे नाहीत पण ग्राम देवळात ते सहज सुटायचे. पिढ्यान पिढ्या चालत आलेले वैर एका झटक्‍यात देवळात सुटल्याची अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. आदर्श गावाच्या निर्मितीसाठी मंदीरांचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही. सध्या अनेक गावात दुपारच्या वेळी पत्त्याचे खेळ रंगतात. अशा चंगळवादी संस्कृतीला मार्ग दाखविण्याची आज गरज आहे. काळ बदलत चालला आहे. पूर्वीचे दिवस आता राहीले नाहीत. रिकाम टेकड्या माणसांना आता काही कालावधीत जगणे असह्य होणार आहे. यासाठी गावातील मंदीरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि भरकटलेल्या जनतेला वास्तवाचे भान करून देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विवेकी गावे तयार करण्याची गरज आहे. अशा गावात ब्रम्हविद्या नांदते हे विचारात घ्यायला हवे.

राजेंद्र घोरपडे,
पुणे

No comments:

Post a Comment