Tuesday, July 6, 2010

आली आषाढी

आली आषाढी
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी का कठीणु जाहला ।।
तरी हाची अनुष्ठिला । भला देखे ।।
विद्यार्थ्याने अभ्यास करणे हा त्याचा धर्म आहे. शेतकऱ्यांने शेतात कष्ट करणे हा त्याचा धर्म आहे. कर्मचाऱ्यांनी स्वतःवर पडलेली जबाबदारी न चुकता पार पाडणे ही त्याचा धर्म आहे. स्वतःचे कर्तव्य हाच खरा धर्म आहे. आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्याने साधना करणे हा त्याचा धर्म आहे. हा धर्म पाळताना अनेक अडचणी येतात. पण त्या कठीण प्रसंगाना सामोरे जावे. न डगमगता, न भिता आपल्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करणे हाच खरा धर्म आहे. शेती करताना नुकसान झाले म्हणून शेती सोडून देणे हा धर्म नाही. शांततेने त्यावर विचार करून त्यात प्रगती साधने आवश्‍यक आहे. त्यातच खरे धर्माचे पालन आहे. अनेक जण असे म्हणतात की साधना करता अनेक अडचणी येतात. वेळच मिळत नाही. काहींना काय करावे हेच सुचत नाही. साधना होतच नाही म्हणून ती टाळणे योग्य नाही. साधनेची गोडी लागावी लागते. गोडी लागली की ती आपोआप होते. आपण जे कर्म करतो त्याची गोडी लागावी लागते मग कंटाळा येत नाही. शेतीच्या कामाची गोडी लागली तर प्रगतीशील शेतकरी होण्यास फारसा वेळ लागत नाही.

राजेंद्र घोरपडे
पुणे

No comments:

Post a Comment