Wednesday, July 7, 2010

आत्मज्ञानासाठी गुरुसेवा

आत्मज्ञानासाठी गुरुसेवा
ते ज्ञान पै गा बरवे । जरी मनी आथि आणावे ।।
तरी संता या भजावे । सर्वस्वेशी ।।
जे ज्ञानाचा कुरूठा । तेथ सेवा हा दारवंटा ।।
तो स्वाधीन करू सुभटा । वोळगोनी ।।
आत्मज्ञानी होण्यासाठी सतसंग हा आवश्‍यक आहे. गुरुकृपेशिवाय आत्मज्ञानाचा लाभ होत नाही. आत्मज्ञानाची ओढ लागली, गोडी लागली की सहजच पाऊले गुरुच्या शोधात बाहेर पडतात. पण इथे गुरु भेटल्यानंतर जसा शिष्य गुरुच्या शोधात असतो तसेच गुरुही शिष्याच्या शोधात असतो याची अनुभुती निश्‍चितच येते. गुरु कसा ओळखावा हा सर्वांचा नेहमीचा प्रश्‍न आहे. देशात उपदेश सांगणारे अध्यात्मावर बोलणारे निरुपण करणारे असंख्य गुरु आहेत. पण खरा गुरु हा मनकवडा असतो. तो तुमच्या मनातील सर्व गोष्टी जाणतो. त्याच्या चरणी लीन झाल्यानंतर तुम्हाला शांती लाभते. मनाच्या शांतीनंतर गुरुंचा अनुग्रह होतो. यासाठी भक्ती- सेवा करावी लागते. सेवा याचा अर्थ साधना असा आहे. मनाच्या शांतीसाठी साधना आवश्‍यक आहे. मग अंतःकरणात आपोआप बदल घडतो. आपल्या वागण्यात, बोलण्यात मृदुता येते. जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. यातूनच खऱ्या शांतीचा बोध होतो. आत्मज्ञानाचीही अनुभुती येते.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment