Friday, July 9, 2010

खरा सन्याशी

खरा सन्याशी
आणि मी माझे ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण ।।
पार्था तो सन्यासी जाण । निरंतर ।।
खरे नुकसान मीपणामुळेच होते. हट्ट असावा पण तो कशाचा असावा याला महत्त्व आहे. अंहकाराचा हट्ट नको. हिटलर, सद्दाम हुसेन हे शुर होते, महत्त्वकांक्षी होते. सतत जिंकण्याची त्यांना हौस लागली होती. जग जिंकायला ते निघाले होते. जगावर आपली सत्ता असावी हे त्यांचे स्वप्न होते. या हट्टा पायी या त्यांच्या मीपणामुळे झाले काय? हा इतिहास सांगण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. जगावर आपली सत्ता असावी यासाठी अनेक राज्यांनी युद्धे केली. पण माउलीने जगावर राज्य कसे करायचे हे सांगते. ही सत्ता कशी मिळवायची. एका जागी बसून साऱ्या जगाचे भूत- भविष्य जाणणे ही जगावर सत्ता मिळविल्या सारखेच आहे. दुसऱ्याला शरण येण्यासाठी भाग पाडून जगावर सत्ता मिळविण्यापेक्षा स्वतःतील अहंकार, मीपणा सोडून खरा सन्याशी होऊन आत्मज्ञानी होणाराच खरा महासत्ताक आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

1 comment:

  1. ब्लोग छान आहे...
    http://www.facebook.com/pages/jnanoba-tukoba-vicaramanca/146945191986166?ref=mf

    ReplyDelete