Thursday, July 8, 2010

श्रवणातून मोक्ष

श्रवणातून मोक्ष

तैसा मनाचा मारु न करिता । आणि इंद्रिया दुःख न देता ।।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचीमांजी ।।

ग्रामीण भागात आजही मृत्यूशय्येवर पडलेल्या व्यक्तीसमोर देवाधर्माची पुस्तके वाचण्याची पद्धत आहे. यामागे नेमका कोणता हेतू कोणता? अध्यात्मामध्ये नुसते मन लावून ऐकल्यानेही मोक्षाचा लाभ होतो. मृत्यूसमयी तुमचे जे विचार मनात घोळत असतात ती गती पुढील जन्मी मिळते. मनुष्य देहात जन्म घेण्याचा मुख्य उद्देश हा मोक्ष मिळविणे हा आहे. मृत्यूसमयी जर तुमच्या मनात देवाचे नाम स्मरण होत राहील तर त्याला सहजच मोक्ष प्राप्त होतो. यासाठी सतत नामस्मरणार राहणे हे चांगले. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुंची भक्ती यासारखी सोपी वाट नाही. गुरुमंत्राचे सतत नामस्मरण केल्याने मुक्तीचा मार्ग सुकर होतो. संत गोरा कुंभार मातीला आकार देता देता नामस्मरण करत असते. कोणत्याही कामात असताना नामस्मरण सतत करावे. नामामध्येच शक्ती आहे. यासाठी सतत नामस्मरणात असावे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment