Sunday, April 26, 2020

कुडुलिंब कसे आहे कीडनाशक ?


कडुलिंबापासून तयार करण्यात येणारे कीडनाशक हे मानवाच्या शरीराला उपायकारक ठरत नाही. पूर्वीच्या काळात याचा विचार करूनच याला प्राधान्य दिले गेले असावे. सध्या पाश्‍चिमात्य देशात कडुलिंबाचा कीडनाशक म्हणून कसा व कोठे वापर केला जाऊ शकतो यावर संशोधन सुरु आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857685

जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि का बांधावी कटारें ।
रोग जाय दुधें सागरे । तरी निंब कां पियावा ।।223 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 4 था

ओवीचा अर्थ - जर मंत्रप्रयोगानेंच शत्रूस ठार करता ं येईल, तर कमरेस कट्यार व्यर्थ का बांधून ठेवावी ? जर दुधानें व साखरेनेंचे रोग नाहीसा होईल तर कडूलिंबाचा रस पिण्याचें काय कारण ?

कडुलिंबात औषधी गुण आहेत. अनेक आजारावर याचा वापर पूर्वीच्या काळी केला जात होता. कडुलिंब कीडनाशक म्हणूनही वापरले जात होते. दोन दशकापूर्वी धान्यांची साठवणूक करताना त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला जात होता. या पाल्यामुळे धान्याच्या रासेस कीड लागत नव्हती. धान्याचे संरक्षण होत होते. इतकेच नव्हेतर टोळधाड रोखण्यासाठी याचा वापर त्याकाळात शेतकरी करत होते. सध्या देशात उपलब्ध असणारी कीडनाशके ही शरीराला उपायकारक ठरणारी आहेत. पिकावर, फळावर ही कीडनाशके मारल्यानंतर त्यांचे अंश त्या फळामध्ये तसेच राहतात. अशी फळे खाल्यानंतर ते अंश मानवाच्या शरीरात जात आहेत. प्रमाण कमी असल्याने शरीरावर त्याचा लगेच परिणाम दिसून येत नाही. पण प्रमाण वाढल्यास याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अनेक आजारांना यामुळे निमंत्रण मिळत आहे. यावर उपाय म्हणजे जैविक कीडनाशकांचा वापर होणे गरजेचे आहे. कडुलिंबापासून तयार करण्यात येणारे कीडनाशक हे मानवाच्या शरीराला उपायकारक ठरत नाही. पूर्वीच्या काळात याचा विचार करूनच याला प्राधान्य दिले गेले असावे. सध्या पाश्‍चिमात्य देशात कडुलिंबाचा कीडनाशक म्हणून कसा व कोठे वापर केला जाऊ शकतो यावर संशोधन सुरु आहे. 1959 मध्ये आफ्रिकेतील सुदान देशात टोळधाड आली होती. त्यावेळी एका जर्मन शास्त्रज्ञाला टोळधाड कडुलिंबाला तोंड लावत नाही असे आढळले. त्याने लगेच यावर संशोधन सुरु केले. कडुलिंबाच्या कीडविरोधी गुणधर्माचे संशोधन त्याने केले. सुमारे दोनशे जातीच्या कीटकावर कडुलिंबाचा परिणाम होतो. बटाटा, तंबाखू, कापूस, कोबी, तांदुळ, कॉफी, सोयाबिन अशा अनेक पिकांवर कडुलिंबाची फवारणी उपयोगी पडते असे संशोधनात आढळले आहे. काही कीटकांच्या प्रजातीच्या जनुकावर कडुलिंबाच्या फवारणीचा परिणाम होते असेही आढळले आहे. प्रजातच नष्ट होत असल्याने कडुलिंब अधिकच परिणामकारक असल्याचे आढळले आहे. कडूलिंबामुळे काही कीटक अपंग बनतात तर काहींची भूकच नष्ट होते असेही आढळले आहे. यामुळे पिकांचे संरक्षण होऊ शकते. 


। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment