Wednesday, May 1, 2019

सूर्याभोवती खळे

सूर्या भोवती खळे हा काय प्रकार आहे. यावर अंधश्रद्धाही खूप आहे. ही अंधश्रद्धा दूर करून यामागचे शास्त्र समजावरू सांगण्यासाठी हा लेख प्रपंच...
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685



कोल्हापूरात आज सूर्याभोवती खळे पाहायला मिळाले. त्यानंतर विविध चर्चेला उधाण आले. यापूर्वी म्हणे हे खळे दिसले की एखादी राजकिय विपरित घटना घडते. सूर्याभोवती खळे हे दुष्काळाची चाहूल असते किवा काही भयंकर घटना घडण्याचे संकेत असतात. अशा चर्चा काणावर येऊ लागल्या. नव्वदच्या दशकापर्यंत हे सर्व ठिक होते. कारण त्याकाळात तंत्रज्ञानाचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला नव्हता. अपशकून, अंधश्रद्धेचे विचार त्याकाळात मानले जात होते. पण इंटरनेट आणि संगणकानंतर देशात तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे जग हे जवळ वाटू लागले. साधे साधे शोधही खोलवर जाऊन मनावर राज्य करू लागले. जगात घडलेल्या घटनांचा, शोधांचा प्रसार लगेच होऊ लागला तसा अंधश्रद्धा कमी होताना पाहायला मिळाली. पण अद्यापही आज सूर्याभोवती पडलेल्या खळ्यामुळे अद्यापही समाजात अंधश्रद्धेचे भूत कायम असल्याचे जाणवले. तंत्रज्ञानाने प्रगती केली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीती काही हटलेली नाही. मुळात याचाच फायदा हे बुवाबाजी करणारे लोक घेत असल्याचे यातून स्पष्ट झाले. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी व त्यानंतर वारकरी संप्रदायातील अनेक थोर संतांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले व लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले. लोकांना शहाणे करण्याचे काम केले. पण नंतरही समाजात भीती ही होतीच. भीतीमुळेच लोक अंधश्रद्धेचे बळी पडतात. यासाठी शास्त्राचा अभ्यास करून लोकांच्या मनातील भीती घालवण्याची गरज आहे. संतांनी जनतेला अभय देण्याचा प्रयत्न नेहमीच केला. तसा प्रयत्नही आता होण्याची गरज आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आज त्याची गरज वाटते. 

आज सूर्याभोवती दिसलेले खळे किंवा रिंगण हे आपण शास्त्रीय दृष्टीतून पाहायला हवे. नेमके हे कशामुळे घडते. त्याचा अभ्यास करायला हवा. ते जाणून घ्यायला हवे. आज गुगलवर गेला तर या विषयावर इंतंभूत माहिती उपलब्ध आहे. पण आपण तसे फारसे करताना दिसत नाही. आता मात्र शास्त्रीय दुष्टीकोनातून सर्व गोष्टी पाहायला हव्यात. मानव चंद्रावर गेला आणि या विश्वाच्या पोकळीचाही शोध तो घेत आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली याचाही शोध आता स्पष्ट होत आहे. 

कोल्हापुरातील खगोलशास्त्र अभ्यासक डाॅ. प्रा. मिलिंद मनोहर कारंजकर यांच्यामते सूर्याभोवताली पडणारे खळे हे फिजिक्समधील आॅपटिक्सचा हा भाग आहे. सूर्या भोवतालचा खळे किंवा रिंगण हा प्रिझममधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात तसा हा प्रकार आहे. सूर्याभोवतीच्या खळ्यास इंग्रजीमध्ये हेलो (Halo) असेही म्हणतात. हॅलो यास मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हटले जाते. वादळ आल्यानंतर आकाशामध्ये जवळजवळ 20 हजार फुटवर सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगामध्ये लाखोंच्या संख्येने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन किंवा स्पिल्टिंग होते. यातूनच सूर्याच्या भोवती रिंगण किंवा खळे पाहायला मिळते. यामध्ये बर्फाचे तुकडे हे प्रिझमप्रमाणे काम करतात. पाण्याचा रिफरॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे. पाणी हे द्रव स्वरूपात आहे तर बर्फ हा घन पदार्थ आहे. हवेतून सर्याचे किरण जेव्हा घन पदार्थातून जातात. तेव्हा माध्यम बदलते.  1.33 रिफरॅक्टिव्ह इंडेक्समधून गेल्यानंतर या किरणांचे वक्रिकरण होते. यातून हे खळे दिसते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लालरंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवतीही हे खळे दिसते. 



No comments:

Post a Comment