Wednesday, August 4, 2010

लहरींचा शोध

ऐसी शरीरा बाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे ।
तंव आतु त्राय मोडे । मनोधर्माची ।।
पूर्वीच्या काळी साधनेसाठी डोंगर कपारीत गुहांची निर्मिती केली जात होती. पण साधनेसाठी गुहाच का? हा प्रश्‍न प्रत्येकाला पडला असणार. पूर्वी तितके ध्वनी प्रदूषणही नव्हते. सध्याच्या आधुनिक युगात ध्वनी प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा काळात साधनेसाठी गुहांचा वापर केला जात नाही पण त्याकाळी गुहेत जाऊन साधना केली जात होती. विद्युत लहरी दिसत नाहीत. त्या वातावरणात असतात. या लहरींचा परिणाम आपल्या मनावर होतो. वातावरणातील या लहरी गुहेमध्ये पोहोचू शकत नाहीत. पोहचल्यातरी त्याची तीव्रता खूपच कमी असते. नगण्य असते. याचे उत्तम उदाहरण सांगता येऊ शकेल म्हणजे गुहेत मोबाईलला रेंज मिळत नाही. पण त्या काळी हे तंत्रज्ञान नव्हते. मग या लहरींचा शोध नेमका केव्हा लागला. आपल्या साधुसंतांना या लहरींची कल्पना निश्‍चितच असणार. म्हणूनच तर त्यांनी साधनेसाठी गुहांची निर्मिती केली. पण काही असो शरीरा बाहेरच्या या लहरींच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी गुहेत साधना केली जात होती. मनाला स्थिर ठेवण्यासाठी किती खोलवर विचार त्याकाळी केला जात होता. हे यातून दिसते.

No comments:

Post a Comment