कैसें अनुग्रहांचे करणें । पार्थाचे पाहणें आणि न पाहणे ।
तयाहीसकट नारायणें । व्यापूनि घातले ।।
आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर गुरुकृपा हवीच. यासाठी गुरूंचा अनुग्रह होणे आवश्यक आहे. भक्ताची योग्य प्रगती पाहूनच सद्गुरू भक्तास अनुग्रह देतात. अनुग्रह देतात म्हणजे नेमके काय करतात? हा प्रत्येक भक्ताचा उत्सुकतेचा विषय असतो. सद्गुरू भक्ताची भक्ती पाहतात. आत्मज्ञानी असल्याने भक्ताच्या आवडीनिवडी ते ओळखतात. त्यांची भक्तीची ओढ पाहून योग्य गुरुमंत्र ते देतात. यालाच अनुग्रह झाला असे म्हटले जाते. नुसता अनुग्रह मिळून उपयोग नाही. गुरुकृपाही हवीच. गुरूमंत्राच्या नियमित जपाने, साधनेने आध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. "गुरूविन कोण दाखवील वाट' असे हे यासाठीच म्हटले गेले आहे. ते यासाठीच. गुरुंच्याकृपेने हे सहज साध्य होते. यासाठी वणवण भटकावे लागत नाही. अनुग्रह ही आत्मज्ञान प्रातीसाठीची पहिली पायरी आहे. सद्गुरूंच्या कृपेने भक्त या पायऱ्या सहज पार करतो. शेवटी या नराचा नारायण होतो.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment