Tuesday, August 31, 2010

स्वप्न

तरी स्वप्नौनी जागृती येता । काय पाय दुखती पंडुसुता ।
का स्वप्नामांजी असता । प्रवासु होय ।।

प्रत्येक व्यक्ती काहींना काही स्वप्ने उराशी बाळगत असतो. स्वप्ने असावीत. त्यातूनच नवनव्या आशा उत्पन्न होतात. विचार सुरू राहतात. प्रगती होत राहते. काही ना काही तरी करण्याची धडपड सुरू राहते. यातूनच विकासाचे खरे मार्ग सापडतात. स्वप्न भंगले. तरी निराशा येत नाही. कारण ते शेवटी स्वप्न असते. सत्य परिस्थिती नसते. स्वप्न हे नेहमी चांगल्या गोष्टीचे असावे. रात्री झोपेत सुद्धा आपणास काही स्वप्ने पडतात. ती चांगली असतात असे नाही. असे म्हणतात की पहाटेच्यावेळी पडलेली स्वप्ने ही खरी होतात. कोण जाणे. स्वप्न चांगले असेल तर ते खरे मानायला काहीच हरकत नाही. कदाचित त्यामुळेही ते स्वप्न सत्यात उतरेल. काही भीतीदायक स्वप्ने पडतात. पण ते स्वप्न असते. त्यामुळे जागे झाल्यावर त्यातील भीती नसते. अज्ञानाने आपण देहाच्या सुखामागे धावत आहोत. या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज आहे. आत्मज्ञानाची जागृती होणे गरजेचे आहे. डोळ्यावरची अज्ञानाची झापड दूर होण्याची गरज आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment