Tuesday, August 10, 2010

अनुभूती

अनुभूती
जया सद्‌गुरू तारू पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे ।
जया आत्मनिवेदन तरांडे । आकळिले ।।
सद्‌गुरुंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते. पण प्रत्यक्षात ही साधना सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरूमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्‌गुरू देतात. त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्‌गुरुंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत अशी अनुभूती येते. पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी अवधानाचा वाफसा असणे आवश्‍यक आहे. तरच गुरूमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. हे बीज वाया जाणार नाही ना? अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहते. काळजी वाटते पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरवते हे सद्‌गुरूच आहेत. हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. आपल्या डोळ्यावरची ही झापड सद्‌गुरू दूर करतात आणि आपणा दृष्टी देतात.

No comments:

Post a Comment