Friday, February 28, 2020

यशासाठी धीर हवा



तू अनुचिता चित्त नेदिसी। धीरु कंहीच न सांडिसी।
तुझेनि नामें अपयशीं। दिशा लंघिजे ।। 8 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 2 रा


ओवीचा अर्थ - एरवी तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडीत नाहीस, तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावे.

पैशाच्या जोरावर दंगामस्ती करणारी आपली चंगळवादी संस्कृती नाही. पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा, हे आपल्या संस्कृतीत शिकविले जाते. अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी अशी आपली संस्कृती आहे. पण आपण ती विसरत चाललो आहोत. मानसिकता ढळू लागल्यानेच अनेक समस्या आता उभ्या राहू लागल्या आहेत. किरकोळ कारणांवरून गुन्हेगारी, आत्महत्या घडत आहेत. छोट्या छोट्या अपयशाने आपण खचून जात आहोत. आपल्या संस्कृतीचा ऱ्हास यास कारणीभूत आहे. योग्य संस्कार घडवणारी आपली संस्कृती आपण यासाठीच जोपासायला हवी. अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष, कठीण प्रसंगी धीर ढळू न देणे व सत्याची कास धरायला शिकले पाहिजे, तर केव्हाच आपल्या पदरी अपयश येणार नाही.

No comments:

Post a Comment