Saturday, March 4, 2017

एबीपीमाझाचे आभार

ऎबीपी माझा तर्फे कोल्हापूरातील सयाजी हाॅटेलमध्ये आयोजित रिइनव्हेंट महाराष्ट्रा ए टेक्नाॅलाॅजी या विषयाच्या सेमीनारमध्ये आज सहभागी होण्याची संधी मिळाली. माझ्या श्री अथर्व प्रकाशनकडून मी सहभागी झालो होतो. कोल्हापूरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते. आपणही एक संस्था चालवतो. याची जाणिव कधी मला झालीच नाही. पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करताना या व्यवसायात मी नवे तंत्र पुरेपुर वापरले. नोकरी करत हा व्यवसाय करताना खरंतर तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच मला प्रोत्साहन मिळाले. खरचं किती सोपे झाले आहे काम याची जाणिव या सेमिनारमुळे झाली. खरंतर प्रथम विश्वासच वाटत नव्हता आपण एक उद्योजकही आहोत याचा...पुस्तक प्रकाशित करणे हे एक आव्हान असते आणि ते खपवणे हे त्याहूनही कठीण काम असते पण हे आव्हान आपण स्वीकारले. त्यात यशही मिळाले साहित्यिक संस्थांचे पुरस्कारही मिळाले. इतके यश आपण मिळवले हजारो-हजारो प्रती खपवून आपण नावही कमावले हे कधी वाटलेही नाही पण या सेमिनारने मला त्याची जाणिव दिली. नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन धंदा आणखी वाढविण्याची उमेद माझ्यात जागी केली. यासाठी संयोजकांचे आभार जरुर मानायला हवेत. एचपीचेही आभार कारण त्यांच्या तंत्रज्ञानानेच आपण हे यश मिळवले आहे. डेलीहंटसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाची साथ तर आहेच. पण याची जाणिव झाली नवी उमेद माझ्यात जागी झाली यासाठी एबीपीमाझाचे आभार जरुर मानायला हवेत...

No comments:

Post a Comment