Tuesday, February 12, 2013

शेतीत यांत्रिकिकरणातूनच आता दुसरी हरितक्रांती !


राजेंद्र घोरपडे

सध्या शेतीमध्ये मजूरांची मोठी टंचाई भासते. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यातच वाढती मजूरी आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेती फायद्याची होत नाही अशी ओरड होऊ लागली आहे. तर पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे यात्रिकीकरणामध्येही मर्यादा पडत आहेत. वाढता उत्पादन खर्च शेतीमध्ये अनेक समस्या उत्पन्न करत आहे. अशा या परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन आज नव्या पिढीतील संशोधकां समोर आहे. असेच काही उदात्त हेतू समोर ठेऊन कोल्हापूरातील कृषि महाविद्यालयात "कृषी यांत्रिकीकरण आणि प्रक्रिया' यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे कोल्हापूरातील स्थानिक केंद्र, कृषी अवजारे उत्पादक संघटना यांच्या सहकार्याने कृषी महाविद्यालयात ही कार्यशाळा झाली. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी संशोधकांनी मार्गदर्शन केले. नवी आव्हाने, संधी याची ओळख करून दिली. या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर विभागातील 12 कृषी महाविद्यालयातील 68 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यशाळेत सहभागी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील अश्‍विनी कांबळे, अश्‍विनी वंजारी, ज्योती पाटील या विद्यार्थीनी म्हणाल्या की सध्या कृषी अभियांत्रिकी या विषयात अनेक संधी उपलब्ध आहेत. विशेषतः संशोधनाची अनेक आव्हाने समोर असल्याने यामध्ये करिअर करण्याचा आमचा मानसा आहे. सध्याच्या गरजा विचारात घेऊन अवजारांची निर्मिती करावी लागणार आहे. संधी म्हणाल तर आता दुसरी हरित क्रांती देशात घडवायची असेल तर कृषी यांत्रिकीकरणामध्ये अमुलाग्र प्रगती व्हायला हवी. यातूनच आता क्रांती होणार आहे. यामध्ये महिलांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. कारण येथे मुलींना ट्रॅक्‍टर स्वतः चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. अशा उपक्रमामुळेच आम्हा मुलींना प्रोत्साहन मिळते आहे. कोल्हापूर कृषी महाविद्यालयात शिकणारे मध्यप्रदेशातील अंबरिश पंड्या, कन्हैयालाल साकेत आणि बिहारचा अविनाश भारती हे विद्यार्थी म्हणाले पंजाब, हरियानाची यांत्रिकिकरणामुळे उत्पादकता अधिक आहे. आमची राज्ये मागे आहेत. महाराष्ट्राही मागे आहे. या राज्यात यांत्रिकिकरणाचीं खरी गरज आहे. हे डॉ. पी. यु. शहारे यांच्या व्याख्यानातून समजले. आता सुधारित अवजारे विकसीत करून राज्यांच्या विकासात योगदान देण्याचा आमचा मानस आहे. बाहुबली कृषी महाविद्यालयातील रोहीत बोरगावे हा विद्यार्थी म्हणाला की इ्‌ंधनाच्या वाढत्या दरामुळे ट्रॅक्‍टर चालवताना इंधनाची बचत कशी करता येते. योग्य वापरातून कार्यक्षमता कशी वाढवली जाऊ शकते हे प्रा. टी. बी. बास्टेवाड यांच्या व्याख्यानातून समजले. त्यांनी केलेले प्रबोधन निश्‍चितच आम्हाला मार्गदर्शक आहे. राजमाची येथील मोकाशी कृषी महाविद्यालयातील संदीप भामरे, भगवान पाटील यांनी अशा कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांचाही सहभाग असायला हवा होता असे मत मांडले. यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या समस्या कशा भेडसावत आहेत. यावर विस्तृत चर्चा झाली असती व यातून अनेक प्रश्‍नांचा उलघडाही झाला असता याचा फायदा निश्‍चितच विद्यार्थी, शेतकरी व मार्गदर्शक तज्ज्ञ, संशोधन यांना झाला असता असे त्यांना वाटते. प्रा. एम. बी. शिंगटे यांनी इंधनाच्या समस्येवर मात करण्यासाठी आता बॅटरीवर, सौर उर्जेवर चालु शकणारी अवजारांचे उत्पादनावर भर देण्याची गरजही बोलून दाखवली. यामध्ये आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संशोधनाच्या मोठ्या संधी आहेत.


No comments:

Post a Comment