Saturday, December 12, 2020

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूरः  गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत.  लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व अल्पपरिचय 20 जानेवारी 2021 पर्यंत पोचतील, अशा रितीने पाठवावीत. कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन आणि बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही ) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जातील. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे असेल.  पहिल्या अक्षरसागर साहित्य संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 

संपर्क - राजन कोनवडेकर (अध्यक्ष)  9822226458,  प्रा. डाॅ. अर्जुन कुंभार (उपाध्यक्ष) 9890156911, डाॅ. मा. ग. गुरव (सदस्य)  9421114262   

पुस्तके पाठवणेचा पत्ता -  बा. स. जठार, सचिव,  अक्षरसागर साहित्य मंच, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी. ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - 416209. मो. 9850393996,    9403466256   

No comments:

Post a Comment