Monday, October 3, 2016

व्यक्तीमत्व विकास....

व्यक्तीमत्व वागण्यातून दिसते. तुम्ही किती उद्धट आहात हे आपल्या कृतीतून दिसून येते. त्यासाठी दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही.
काही दिवसापूर्वी मी असाच एक व्हिडिओ पाहीला. त्यामध्ये अमेरिका व प्रान्सच्या विचारसरणीत कसा फरक आहे. ते दाखवले होते. हे बोलके चित्र खूप काही सांगून जाते. यातून बरेच काही घेण्यासारखे आहे. अमेरिकेत जादा झालेला शेतमाल समुद्रात फेकून दिला जातो. इतकेच नव्हेतर स्टोअर किंवा माँलमध्ये विक्री न झालेले माल भंगारात काढण्यात येतो. तोही कचऱ्यात टाकून दिला जातो. तेथे श्रीमंती आहे. मालाची किंमत नाही. पण यातून अमेरिकेची विचारसरणी कशी आहे याचाही प्रत्यय आपणास येतो. त्याच्या विचारात माणूसकी नाही. याचेही दर्शन होते. पण या ऊलट फ्रान्समध्ये मात्र जास्त झालेला शेतमाल गरजूंना वाटला जातो. स्टोअर किंवा माँलमध्ये जास्त दिवस न विकलेला मालही गरजूंना मोफत वाटला जातो. यातून त्या देशात श्रीमंती कमी आहे असे वाटते. तेथे काही गरजू आहेत. असेही दिसते पण त्याच बरोबर त्यांच्या विचारात माणूसकी आहे. वस्तू टाकावू झाली तरी तिचा योग्य वापर करता येऊ शकतो. एखाद्या गरजूचे पोट त्यातून भरु शकते हा विचार आहे.
हा फरक आहे या दोन देशातला. भारताने यावर जरूर विचार करावा. कोणाशी कसे वागायचे कोणा कडून काय घ्यायला हवे याचाही विचार करायला हवा. परराष्ट्र धोरण ठरविताना हा विचार जरुर विचारात घ्यायला हवा. कदाचित हा एखाद्या देशाबाबत केलेला अपप्रचारही असेल पण यातून शिकण्यासारखे निश्चितच आहे. हे ही विचारात घ्यायला हवे. या दोन्ही देशांशी आपण व्यवहार करताना हा विचार जरुर विचारात ठेवायला हवा.
आपणाकडेही शेतकरी मालाला भाव नाही म्हणून शेतमाल फेकून देतो. त्याने तसे न करता गरजू व्यक्तींना तो वाटला तर त्याला पुण्य मिळेल. मालाला दर मिळाला नाही म्हणून नुकसान झाले खरे पण एखाद्या गरजूचे पोट तरी भरले हे पुण्य पदरात पडले. असा विचार करून जर त्याने व्यवहार केला तर तो नुकसानीने हताश, निराश न होता पुण्याच्या शिदोरीने तो आत्महत्येच्या विचारापासून दूर जाऊ शकतो. हे ही विचारात घ्यायला हरकत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी असा माणसिक आधार त्याला द्यायला हवा. पुण्याचा विचार माणसामध्ये सद्विचार आणतो. सद्संगतीने धैर्य येते. दुष्ट विचारांना आळा बसतो. चुकीच्या मार्गाचा स्वीकार होत नाही. यासाठी नेहमी पुण्य कसे पदरता पाडता येईल याचा विचार करायला हवा. यातून आपले जीवन समृद्ध करायला शिकले पाहिजे.  

No comments:

Post a Comment