नारळाच्या करट्यांपासून राखी
मालवणमधील स.का. पाटील महाविद्यालयातील भुगोलचे प्राध्यापक हसन खान यांच्या कल्पनेतून साकारली आहे पर्यावरणपुरक नारळाच्या करटीपासून राखी.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी
छोट्या गोष्टी देखील मोठा परीणाम घडवतात, फक्त सातत्य हवे. हे निसर्गानेच आपणास शिकविले आहे. निसर्ग शिकवण ही जीवनदृष्टी बदलून प्रवास करण्यास शिकवते. आज असाच एक वेगळा प्रयत्न प्रा. हसन खान व त्यांचे विद्यार्थी सिद्धेश शर्मा आणि अजय आळवे यांनी साकारला आहे. त्यांनी चक्क नारळाच्या करट्यांपासून राख्या तयार केलेल्या आहेत.या उत्सवात काही ठिकाणी वृक्षप्रेमी झाडांना राख्या बांधून वन संरक्षणाची शपथ घेतात. पण या राख्या प्लास्टिक व तत्सम घटकांच्या असतात. साहजिकच यात पर्यावरणाचं रक्षण होत नाही यासाठी या युवकांनी याला पर्याय म्हणून नारळाच्या करटीचा वापर करून राख्या तयार केल्या. या राख्या वेगवेगळ्या आकाराच्या असून त्यावर समुद्र, वारली पेंटिंग, जैवविविधता , मालवणी संदेश याद्वारे निसर्ग व संस्कृतीची झलक दाखण्याचा प्रयत्न या युवकांनी केला आहे.नारळाच्या करटीपासून तयार केलेल्या काही राख्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया जोडण्यात आल्या आहेत. राखी उत्सव झाल्यावर राखी मातीत घातल्यास त्यातून रोप येईल. असाही एक प्रयत्न आम्ही केला आहे.- प्रा. हसन खान, स. का. पाटील महाविद्यालय, मालवणया राख्यांची किंमत २५ रुपये असून आम्ही आशा व्यक्त करतो की, न फेडता येणारे निसर्ग ऋण कमी करण्यासाठी आम्ही केलेल्या छोट्या प्रयत्नाला आपली साथ लाभेल.- अजय आळवे,
आणखी फोटो पाहण्यासाठी http://dhunt.in/aktLF यावर क्लिक करा
No comments:
Post a Comment