Monday, November 2, 2015

मराठी पाऊल पडते पुढे....

'रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे' इतकी टोकाची भूमिका बेळगावच्या युवकांनी घेतली आहे. एक नोव्हेंबर हा दिवस कर्नाटकातील मराठी भाषिक काळा दिवस म्हणुन पाळतात. काळ्या दिनाच्या निमित्ताने ही युवाशक्ती एकवटली. बेळगावसह 865 मराठी बहुल गावे महाराष्ट्रात यायला हवीत यात दुमत नाही यासाठी अनेक शहिदही झाले आहेत हा प्रश्न आता सर्वोच्य न्यायालयात आहे सर्वानाच या प्रश्नाच्या निकालाची उत्सुकता आहे. आता हा प्रश्न चिघळु नये याची दखल घ्यायला हवी. कानडी लोक मराठीचा द्वेश करतात असेही नाही तसे असते तर राज्योत्सवाच्या मिरवणुकीत शांताबाईचा ठेका कानडींनी धरला नसता यापुर्वीही शिंदे बंधुंच्या पोपटाने कानडी लोकांना नाचवले आहे याचा विचार करुन मराठी लोकांनी आता आंदोलनाची दिशा ठरवायला हवी. मराठी माणसाने गनिमी काव्यानेच युद्धे जिंकली आहेत हा इतिहास लक्षात ठेवायला हवा आंदोलनाच्या रणनितीत मात्र याचा अभाव दिसतो. नुसते पेटुन उठणे हा मराठी बाणा नव्हे. मराठीची छाप पडेल असे कार्य व्हायला हवे. आमच्यावर अन्याय होतो म्हणुन रडायचे हे मराठी मानसाला शोभणारे नाही अश्रु हे कोणाचे लक्षण आहे हे तरी धान्यात ठेऊन यापुढे मराठीचा खराखुरा बाणा दाखवायला हवा तशी तयारी आता ठेवायला हवी. एकवटलेल्या युवाशक्तीची ताकद आता मराठीची गुढी सीमाभागात कशी उभारेल हेच आता पहायला हवे. चला तर मग मराठीच्या पताका उंच फडकवुया
- राजेंद्र घोरपडे

No comments:

Post a Comment